Sunday, 15 May 2011

हा नादच खुळा !! वाजले ना बारा



या महिन्यात बरेचसे गंभीर असे विषय या आधीच्या 'पोस्ट' मध्ये आले आहेत ..त्यामुळे डोके जड झाले त्यावर उतारा देण्यासाठी पुढील ब्लोग सादर करत आहे ..मागच्या रविवारची गोष्ट आहे ....ऐका...


रविवार असल्याने तंगड्या वर करून आडवे पडून टंगळ मंगळ करत पडलो होतो. समोर संगणकावर काही व्हीडीओ साँग मधील काहीतरी अवयव हलताना दिसत होते ...(त्याला डान्स किंवा नृत्य म्हणतात) ...एवढ्यात

चैत्रपुनवेची रात, आज आलीया भरात, धडधड काळजात माझ्या माईना,.....................

या ओळी ऐकू आल्या ...आता निरखून पाहणे भाग होते ...खानविलकरांची अमृता आता तिच्यासोबत आमचे बारा वाजवणार होती....मला ती टी.व्ही. वरची डेरीमिल्क ची 'मन मी लड्डू फुटा' ही जाहिरात आठवली कारण तंगड्या पसरून आडव्या पडलेल्या माझ्या डोक्यात अमृता खानविलकर माझ्या शेजारी येवून नाचत आहे असा लाडू फुटला होता ...(त्याचे फार तपशील हा ब्लोग कौटुंबिक असल्याने देता येणार नाहीत ) फुटलेल्या दुसऱ्या लाडवाचे कल्पनाचित्र मात्र येथे मांडता येईल. हा दुसरा लाडू मला थेट २०२५ मध्ये घेवून गेला ...त्यावेळी देखील मराठी ची अवस्था कुसुमाग्रजांनी मागे राज्य शासनाला पत्र पाठवून 'मराठी दरिद्री' झाली असून फाटक्या कपड्याने मंत्रालयाच्या पायऱ्यावर उभी अशीच झाली होती......कोणीतरी कुंचला घेवून त्याचे फटकारे मराठी च्या रक्षणासाठी चालवीत आणि तोंडाची वाफ दडवीत असल्याचे दिसले त्यावरून याचा वारसा 'मातोश्री' किंवा 'कृष्कुंज' असल्याच समजून आले. अश्यावेळी शाळेतील मराठी पुस्तके आहेत तरी कशी हे पाहण्यासाठी मी एका शाळेत गेलो ...आश्चर्य शाळेत मराठीचा तास चालू होता म्हणजे अजून 'मराठी' टिकून होती. या मराठीला जपण्यासाठी मुलांना 'शृंगाररस ' हा विषय शिकवणे चालू होते ....त्यासाठी कविता होती ...हो कविताच

हो...

चैत्रपुनवेची रात, आज आलीया भरात, धडधड काळजात माझ्या माईना,

कधी कवा कुटं कसा, जीव झाला येडापिसा, त्याचा न्हाई भरवसा, तोल र्‍हाईना,

राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले,

पिरतीच्या या रंगी राया, चिंब ओली मी झाले,

राया सोडा अता तरी, काळयेळ न्हाई बरी, पुना भेटु कवातरी साजणा......

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा,

हे....कशापाई छळता, मागंमागं फिरता, असं काय करता दाजी, हिला भेटा की येत्या बाजारी,

हे....सहाची ती गाडी गेली, नवाचीबी गेली, आता बाराची गाडी निघाली,

हिला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा,

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा... हा...जी जी रं जी ||धॄ||

हो....

आयन्यावाणी रुप माजं, उभी ज्वानीच्या मी उंबर्‍यात,

नादावलं खुळंपिसं, कबुतरं ह्ये माज्या उरात,

भवताली भय घाली, रात मोकाट ही चांदन्याची,

उगा घाई कशापाई, हाये नजर उभ्या गावाची,

हे.. नारी गं, रानी गं, हाये नजर उभ्या गावाची,

शेत आलं राखणीला, राघु झालं गोळा,

शीळ घाली आडुन कोनी, करुन तिरपा डोळा,

अता कसं किती झाकु, सांगा कुटंवर राखु, राया भानं माजं मला र्‍हाईना.....|

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा,

हे....कशापाई छळता, मागंमागं फिरता, असं काय करता दाजी, हिला भेटा की येत्या बाजारी,

हे....सहाची ती गाडी गेली, नवाचीबी गेली, आता बाराची गाडी निघाली

हिला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा,

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा... हा...जी जी रं जी ||१||

हो....

आला पाड, झाला भार, भरली उभारी घाटाघाटात,

तंग चोळी, अंग जाळी, टच्च डाळिंब फुटं व्हटात,

गार वारं, झोंबनारं, द्वाड पदर जागी ठरना,

आडोशाच्या खोडीचं मी, कसं गुपित राखु कळंना,

हे.. नारी गं, रानी गं, कसं गुपित राखु कळंना,

मोरावानी डौल माझा, मैनेवानी तोरा,

अवंदाच्या बा वर्सला मी, गाठलं वय सोळा,

जीवा लागली या गोडी, तरी कळ काढा थोडी,घडी आताची ही तुमी र्‍हाउद्या.....|

मला जाउद्या ना... आता वाजले की बारा,

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा, अहो जाउद्या ना घरी,

हे....कशापाई छळता, मागंमागं फिरता, असं काय करता दाजी, हिला भेटा की येत्या बाजारी,

हे... सहाची ती गाडी गेली, नवाचीबी गेली, आता बाराची गाडी निघाली,

हिला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा,

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा... हा...जी जी रं जी ||२||



आता या कवितेवर 'स्वाध्याय' दिलेला होता तो खाली दिलेला आहे त्याची उत्तरे मला पाठवून देणे .....

. खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे द्या

.जीव येडापीसा होणे म्हणजे काय ते सांगून तो कुठे कुठे येडापिसा होतो ते सांगा

. 'राया' , 'दाजी ' यांचे स्वभाव वैशिष्ट्य रेखाटा

. 'उभी ज्वानीच्या मी उंबर्यात' याचा कल्पनाविस्तार करा.

. वरील कवितेच्या आधारे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील परिस्थितीचे चित्रण करा

'आता वाजले कि बारा ' असे कोण कोणास म्हणाले

.' टच्च डाळिंब' चित्र काढा

. मोर , मैना आणि मानव यांच्यातील साम्यस्थळे विषद करा

. '१६ वरीस धोक्याच' आणि 'अवंदाच्या वर्सला मी गाठल वय १६' यांचा तुलनात्मक अभ्यास करून तत्कालीन स्त्रियांची सामाजिक आणि मानसिक स्थिती सोदाहरण स्पष्ट करा.

. या कवितेच्या आधारे 'शृंगाररस ' आणि 'बिभित्स रस' याच्यातील साम्यस्थळे व्हिडीओ पाहून तपशीलवारपणे नमूद करा.

२. खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करून त्यांचे अर्थ स्पष्ट करा

अ. धडधड काळजात न मावणे

ब. बारा वाजणे

क. शेत राखणीला येणे

ड. भान न राहणे


प्रकल्प : या कवितेआधारे ग्रामीण मराठी बोलीचा अभ्यास करण्यासाठी गावात जावून 'अमृता खानविलकर' 'राया' , 'दाजी' यांची भेट घेवून बोली भाषेस उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी त्यांना सोबत घेवून पथनाट्य सादर करा.
.
.
.
.
आपल्या उत्तराची वाट पाहत असलेले इयत्ता १० मधील विद्यार्थी आणि मी ...................

Sunday, 8 May 2011

After Osama dynamics in nearest concentic circle of India




Most of the people in the South Asian continent awake on 2nd May with news of 'USA killing Osama in Pakistan' . euphoria over issues now come to rest and focus fast shifted to strains in USA-Pak relations. As news of killing of Osama brought different feelings of disbelief, anger , surprise and jubilation.

US senators, Media and Pakistan legislators , media persons started to ask questions to Pakistani government , military; it created very difficult and embarrassing situation for decision makers in Pakistan. USA will not immediately strip all it's ties with Pakistan , but there will be change definitely. Diplomatically India need to pressurize USA on Pakistan's front for bringing culprits of various illegal activities in India , and hiding in safe Pakistan to the justice.

It is interesting to see changing scenario in Indian continent, equations have changed dramatically especially between India-Pakistan. US is playing key role in this particular situation. Laden residing in Abottabad since long time corroborate India's valid stand that Pakistan is factory of terrorism and it now became Frankenstein monster. Indications suggest that in coming future this monster will try to pose challenge for mankind and in particular to Pakistan for sure.

Immediate talks are started in USA about withdrawal of Western forces from Afghanistan as justice has been done with main culprit of 9/11 attack. Though Hillary clinton and other leaders from western world suggested they are not going to ask their forces to come back, however deadline of July 2011 for effective reduction in forces as declared by Obama is fast approaching. Pakistan will surly try to take fullest advantage of this. India needs to keep eye on the changing realities in Af-Pak area. India have invested its blood and money in the area and willing for peaceful restoration of Afghanistan. even before present episode situation in Af-Pak created challenge in front of New Delhi as Gen.Kayani is having strong network with Haqqani in Taliban faction , as well as Hamid Karzai willing to have talks with Taliban may seriously undermine Indian interest in case of US withdrawal. India is exploring option of Iran to reach to Afghanistan , however US-Iran don't see eye to eye at international level. There are some groups in USA , they support engagement of Iran in Af-Pak, New delhi can concentrate on the issue. At the same time proposal put forwarded by Robert Blackwil (Former US Ambassador to India) for partition of Afghanistan may lead to instability so, no need to focus on that.

We should not neglect recent development of Pakistan's advice to Afghanistan for taking help of China , instead of USA. This development is not just limited to Af-Pak region rather have wider implications if one take into consideration angle of Central Asia (The new great game). In this particular context even though we have visualized dream of silk route , practicalities suggest different things . Our emery security demands urgent land or sea based connection with the area and either Afghanistan or Iran (chabahar port ) can secure us on that front.

In Pakistan , this episode created sense of insecurity among people as it indicated inability of military forces. Feudal Pakistan society witness strange paradox where common man seriously doubt about ability of civilian leadership and at the same time blindly follow decisions by Military. 'Op Osama' for the first time in Pakistan's history threatened military forces credibility. This is better situation for India for supporting democratic forces in Pakistan as moral of security forces in Pakistan is at the lowest possible mark. However India should not divert it's process of talks with civilian government. India can also explore the possibility of back channel diplomacy with Islamabad , if not explored till date. Indian establishments know better that talks with Musharraf have yielded some positive results hence while supporting democratic forces don't neglect Rawalpindi.

In India there are some sections who are willing to follow USA path and asking government to undertake covert operations, Pakistani establishment reacted very strongly to such indications; I believe that our Ministry Of External Affairs (MEA) is not considering this options seriously still we should not divert from current process of talks and at the same time MEA should reach to common man specially youth and explain pro's and con's of any such operation. MEA and foreign secretary too using social networking to reach towards people , however they need to do it extensively particularly in case of Pakistan as we can change our friends or enemy but can't overlook neighbor.

Though are numerous other angles to the issue not possible to cover due to limitation. In the end keeping national interest in mind 'Trust but verify' should be our mantra for dealing with Pakistan.

Tuesday, 3 May 2011

Post-Osama will there be safer world?


Before 9/11 also Osama was known for his terrorist activities , those were started way back in 1979 after Afghanistan's invasion by then USSR which made him known face... however after 9/11 attack Osama bin Laden become synonymous with terrorism at the world level. from Kid to elderly person everyone was under threat ....and name of the threat was Laden.....all that is now become history with 'op kill Osama' by USA which killed 'most wanted man' world have taken a relief .

Real question is whether killing of Osama will make this world safer of a Human Being , a direct answer is big no. So lets take look at terrorism , there is no consensus among scholars about definition of terrorism but surely those uses violent means to achieve political motives mostly to overthrow the legitimate government and establish their own are defined as terrorist and their acts as terrorism.

In academic terms terrorism have 4 typologies 1. Left Wing terrorism- various communist movements 2. Right Wing Terrorism - Nazism 3. Ethano-nationalist -numerous in African continent 4. Religious - Al-Qaeda . I want to focus primarily on 4th type i.e Religious.

India was experiencing terrorism since 1989 , as Pakistan govt. used it as an instrument against India in their war for Kashmir , this was the time when cracks were appeared in USSR regime and hence US now was not needed help of terror groups as their prime enemy was eliminated and this created distance between long term friends Osama and US . Osama and his folks feels they were betrayed by US and they were merely used so they were in position to take revenge with US. Different policies of US on cultural , religious front further deepen feeling of betray among these groups. Taliban coming to power in 1996 gave moral boost to terror groups and they used machinery and resources of state to achieve their aim of taking revenge . Attacks on US consulates in different parts of world , first unsuccessful attempt for attack of WTC were part of these series. Apart from angle of USSR some other cultural, economic and political reasons were also gave impetus for their rivalry. Fransis Fukuyama termed these terrorist as Islamo Fascist. I will try to illustrate reasons in little bit-

Cultural - It dates back to fall of ottoman empire after 1st world war and Kemal came to rule in Turkey which although on one way brought waves of modernity in Islamic world , however at the same time sowed seed of enmity. Egypt also experienced same thing with rule of Anwar Saddat , Nasser , to whom hardcore Islamic forces consider as pro west. Islamic forces felt that these pro western , Modern values are threatening our own culture , values. This anger was felt at local level at high intensity. This led to Anti-west/Modern movements , Muslim Brotherhood movement was one of such movement. Islamic groups felt Sayyid Qutab who led 'Muslim Brotherhood' movement in Egypt and died in 1966 for the cause. Revolution in Iran under Khomeni further gave boost for hardcore Islamic groups. During same period episode of Afghan invasion happen US tactically used these Islamic forces against 'Red Army' of USSR. In front of challenge of 'communist' US totally neglected anger among Islamic world. After withdrawal of USSR forces US concentrated on Gulf and launched a war against Iraq. US forces went into Middle-East , presence of US troops in holy towns of Macca and Madina seriously undermine sentiments of Muslims and this led to launch of Islamic forces war against US. A rich Osama provided his money, contacts , infrastructure in a 'sacrosanct ' cause of 'Jihad' against modernity represented by pro-west forces. Samuel Huntington in his famous book 'Clash of Civilization' 1996 , though have many shortcoming gave glimpses of cultural rivalry.

Economic-The US and post -industrial states of western Europe dominates international economic institutions IMF, World Bank. Political decisions of many underdeveloped countries and in particular from Islamic world to accept privatization , deregulation lead to significant social and economic upheaval. Some study shown that sense of alienation and lack of opportunity among some Muslim males is also an contributing factor for their decision to turn to violence globally. Attack against WTC can be seen as blow against icon of global capitalism. Links between poverty and terrorism can be seen as vital in this context.

Religion- Global jihad is seen as reaction to the perceived oppression of Muslim's worldwide and spiritual bankruptcy of the west. Believers in global jihad view that rulers of 'Islamic' countries such as Pakistan, S.Arabia as apostates (those Muslim's who are presently not following Islam) have compromised Islamic values in the pursuit of Secular, state based power. Differences in value structures make deterrence of religious terrorism difficult. Religious terrorist seek to replace the normative structure of society. After all religion provide terrorist groups a crucial advantage :the mandate and sanctions of the divine to commit otherwise illegal or immoral acts.

Now I want to move towards globalization, technology and terrorism. Answer to Title is sadly negative as I have stated earlier. But why? here comes the role of globalization, Technology which in some ways providing help in sustaining acts of terrorism and their Ideology. The technological advances associated with globalization have improved the capabilities of terrorist groups to plan and conduct operations with far more devastation.

Traditionally terrorist found it difficult to propagate their idea's , messages , states have advantage in their ability to control flow of information and use of resources but Internet has changed this dynamics. Hence although prominent 'Jihadi' terrorist groups physical presence can be removed , their virtual presence and influence is immortalized.

In present day it is possible for different terrorist cells to mount coordinated attacks in different countries at different locations at the same time . Indeed it is a hallmark of militant Islamic groups. Serial bombings in Mumbai, Madrid are examples of this. Online jihadi discussion forums are available on internet.

Security of terrorist organizations has been preserved by limiting communication and information exchange among different cells. exchange of information is done with using specific codes known only to few individuals . All this will help to hide identities of those working in different cells. Use of proxy servers for using Internet is also one of such kind of example.

Globalization paved the way for mobility for terrorist. In open societies, that have well developed infrastructures,terrorist have been able to move rapidly within and between borders and this complicates matter to trace them. Terrorist use transportation extensively but it need not be overtly in nature. volume of goods transported in support of globalized economy increased extensively and it is not possible to inspect each and every container passing through border.

Terrorist groups become more and more lethal. There is possibility of use of WMD's or even of nuclear thanks to network of Mr. A.Q.Khan. Globalization has facilitated access to weapons , resources and proficiency required to conduct smaller , but more lethal attacks.

Various digital videos suggest that terrorist are already conducting Distance education through virtual 'jihad' academy in which prospective terrorist study everything from conducting ambush attacks to making and using improvised explosive devices (IED)

All the above illustration suggest that even after death of Osama Bind Laden - face of terrorism- terrorism will not end because it is an ideology which is deeply rooted among Islamic world , mainly in the minds of people and specifically of youths of those countries. However Globalization and technology associated with it has improved ability of states, hence they are also trying to counter this asymmetric warfare.

In the end I want to say that the inescapable dilemma for Islamic terrorist is that they could not promote their values without engaging with a world of politics and economics , this will bound to affect the very nature of Islamic community and this might be the ray of Hope for Human Kind. As this kind of terrorism go beyond borders of Nation State cooperation of all states at world level is very much important.

Wednesday, 20 April 2011

' सई रे सई ' राडा रॉक्स


चित्रपट पहाणे हि आपली सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे का? बहुतांशी याचे उत्तर नाही असेच आहे मी मात्र ते माझे कर्तव्य आहे या प्रेरणेने चित्रपट पहात आलो आहे.अगदी लहानपणापासून चित्रपट ही माझी कमजोरी आहे , कॉलेज च्या दिवसात तर शनिवारी 'अलका' मध्ये इंग्रजी आणि इतरत्र कुठेही हिंदी किंवा मराठी (प्रभात) नित्यनियमाने पहिले आहेत. अर्थात त्यावेळी तिकीट देखील कमी होते. मंगला च्या सकाळच्या शो चे तिकीट तर १० रु. होते. आज देखील मी पूर्वी इतक्या नित्य नियमाने नाही पण तरी महिन्या काठी २ चित्रपट थेटरात आणि मग वेळ मिळेल तसे घरी पाहतो. यावरून आपल्या लक्षात आलेच असेल मला पिक्चर पाहण्याची दैदिप्यमान परंपरा आहे ...... परंपरा ही दैदिप्यमान किंवा गौरवशाली का असते काय माहीत पण असते तर त्याच विषयावर मला काही सांगायचे आहे.

चित्रपटाचे परीक्षण वाचून ते पाहण्याची खोड मला असली तरी बिनदिक्कत देखील चित्रपट मी पाहत आलो आहे , हे परीक्षणाचे खूळ या मागील ३ ते ४ वर्षातील आहे . खर तर माझ्या धैर्याची तुम्ही 'सराहना' करायला पाहिजे परीक्षणात भिक्क्क्कार म्हणलेल्या अनेक पिक्चरला मी गेलेलो आहे.' कॅश ' नामक तद्दन फालतू पिक्चर देखील मी पहिला आहे . क्रांती शहा चा 'गुंडा' तसेच कमल सदना , अनिल धवन , राहुल रॉय, किमी 'कपडे' काटकसरकर यांचे देखील मी पिक्चर मी पहिले आहेत. सपेरा, लुटेरा, मुडदे कि जन खतरे मी , पापी हसीना , खून कि होली मराठी म्हणाल तर नाथा पुरे आता , बघ हात दाखवून असले पिक्चर पण मी पाहिले.

एवढे नमनाला तेल लावल्यावर मुद्द्यावर यायचं म्हणजे मी नुकताच ' राडा रॉक्स' हा मराठी चित्रपट पाहिला. काही दिवस आधीच संतोष जुवेकर या मराठीमधील नटाने मराठीत पण चकाचक , रॉक, पॉप, हाणामारीचे असे नवे सिनेमे येत असतात प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद द्यावा केवळ 'विनोद' म्हणजे मराठी चित्रपट नव्हे असे आपले खुपणे क्रांती रेडकर आणि अवधूत रावांच्या साक्षीने सांगितले होते. त्याला स्मरून हा 'राडा रॉक्स' नावाचा हातोडा मी आणि माझ्या भावाने डोक्यात, मनावर , डोळ्यांवर सगळीकडे मारून घेतला आणि काळानिळा झालो . कळस म्हणजे रविवारची दुपार ३.१५ वाजलेले अशावेळी मस्तपैकी ताणून द्यायची सोडून केवळ आणि केवळ 'धैर्याच्या' बळावर हा चित्रपट पहायला आम्ही मल्टीप्लेक्सात पावूल टाकले , आजूबाजूला मॉल मधल्या कन्यकांकडे कानाडोळा करून चित्रपटगृहात घुसलो . खरतर या धैर्यासाठी त्या मौटन ड्यू, थम्प्स अप सारख्या जाहिरातीत आम्हाला काम द्यायला पाहिजे तेवढेच पैसे तरी मिळतील आणि ते म्हणतातच न 'डर के आगे जीत है ' पण तसले काही आमच्या बाबतीत झाले नाही .

ढन ढन म्युझिक च्या आवाजात सुरवातीला दिलेला एक इशारा नजरेआड जाण्याआधी मी वाचला ' हा चित्रपट पाहण्यापूर्वी आपले डोके घरी विसरून या , या कथेतील व्यक्तिरेखांचा वास्तविक जीवनाशी संबंध नाही मात्र प्रत्यक्षात कोणी आढळल्यास त्याला जवळच्या मनोरुग्णालयात सोडावे' खरेतर ही धोक्याची घंटा होती पण असेल नेहमी सारखीच सूचना म्हणून तिला मी धुडकावून लावली. चित्रपटातील कलाकारांची नामावली येवू लागली सगळी अपरिचित नावे पराग पाटील , उदय नेने, निशा परब वगैरे ....आणि ते पूर्वीच्या चित्रपतात सर्वात शेवटचे नाव 'प्राण' चे असेल तर 'And Pran ' असे देत त्या थाटात ' आणि सई ताम्हणकर ' असे नाव दिले होते कारण इतर अपरीचितात तिचेच नाव आणि चेहरा परिचित होता. सनई चौघडे वगैरे चा अनुभव पाठीशी असल्याने थोडी आशा होती , बाकी नवीन असली तरी एक संधी द्यायला काय हरकत होती. चित्रपटगृहात मोजून १० माणसे होती ....... कोणत्या तरी कॉलेज भोवती सुरवातीची दहा मिनिटे निर्मात्याने वाया घातली मास्तरला कमी एकू येते असे सांगून नवीन विद्यार्थ्यांना जोरात बोलायला लावणारा आणि त्यातून मास्तर , ते नवीन विद्यार्थी यांची का खरतर माझी फिरकी घेणारा हा सई बाईंचा ग्रुप नंतर मग एका पोराला त्रास देतो तो मास्तर निघतो असले पांचट प्रकार चालू होते. 'सुश्मिता सेन ' मै हु ना ! मध्ये वर्गात आल्यावर कसे आल्हाददायक वाटायचे पण सुश्मिता च्या कोसो दूर असलेली एक बाई सुश्मिताची आठवण करून देईल असा उपटसुंभ विचार या सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या मनात आला या वरून आपण खिंडीत सापडलो आहोत याची जाणीव झाली . असल्या प्रकार नंतर तो कॉलेजचा प्रिन्सिपॉल ज्याला सतत कोणत्या न कोणत्या अभिनेत्याने पछाडलेले असते जसे राजकुमार , देव आनंद , शोलेचा ठाकूर इत्यादी. असल्या या कॉलेजात सई बाई आणि त्यांची चांडाळ चौकडी हातात गिटार घेवून फिरत असते यावरून आपल्याला काही अर्थबोध होत नाही . मग उगीच कॉलेजमधले दोन विरोधी गट एक राजपाल यादवचा आणि दुसरा राज ठाकरे ची भ्रष्ट नक्कल करणारा इसम . स्मिता ठाकरे आहे ना निर्माती बरोबर आहे काढणारच उट्टे, पैसे पाहिजेत ना शिवसेने कडून .

अरररारा काय रे ते राजपाल चे मराठी आणि त्याचे पाचकळ विनोद , सुरवातीच्या २० मिनिटानंतर मी पिक्चर कडून अपेक्षा सोडून दिली , इतरांनीही दिली असावी कारण १० जणांपैकी ६ जण उठून निघून गेले . आम्ही मात्र तसेच 'धैर्य ' आहे ना आमच्याकडे . पुढे अर्धा चित्रपट झाला तरी मला पिक्चर चा उद्देशच कळेना शेवटी दिग्दर्शकाला माझी दया आली असावी सई आणि तिच्या ग्रुपला एक रॉक अल्बम काढायचा आहे आणि त्या साठी हा सगळा खटाटोप. तिच्या ग्रुप मधील एक जण सोडून ( काय बरे त्याचे नाव जावू दे कशाला उगाच त्रास )सगळे एक जात श्रीमंत ... सिनेमाचा हिरो पराग पाटील याच्या विषयी काय बोलावे ....पिक्चर मध्ये काम करण्यासाठी उत्तम संवादफेक करता आली पाहिजे हे याच्या गावीही नसावे , त्याने फक्त संवादफेक मधील 'फेक' एवढेच एकले असावे पठ्या नुसती मराठी मिश्रित इंग्रजी वाक्यांची फेकाफेक करत होता. त्यांचा एक मित्र गरीब दाखवला आहे तेवढाच आपला 'इमोशनल टच' , अभ्यास वगैरे बाबत बेफिकीर असणारा हा, असो बापडा मी तरी कुठे अभ्यास एके अभ्यास करतो म्हणून तर पिक्चर ला आलो होतो ....हे साहेब घरच्यांचे बोलणे खात असतात त्यामुळे एका BPO मध्ये रात्री नोकरी धरतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडून देतात आणि अल्बम बनवायचाच म्हणून आपले वाटोळे करायला येतात . याची आई घरकाम करून घर चालवते वडील अंथरुणाला खिळलेले ..भांडी, झाडलोट करून घर चालवणारी याची आई हे सर्व करताना आपल्या भरजरी साडीला मिरवायला मात्र विसरत नाही.

यांचा अल्बम पैश्या पायी अडतो तेंव्हा कॉलेज मधील ते दोन गट यांना पैसे देवू करतात अट एकच त्यांच्या ग्रुप साठी कॉलेज निवडणुकीत प्रचारगीत लिहून द्यायचे . सई बाईंच्या ग्रुपचा हिरो अजून एकाला विश्वासात घेत दोन्ही गटांना प्रचारगीत देण्याचे मान्य करतो. साहेब गाणे लिहून दोन्ही गटांना गीते लिहून CD देतात मात्र देताना अदलाबदल करतात झाले आता 'बदले कि आग ' चित्रपटवाल्यांची फेवरेट कन्सेप्ट. पण हाय रे दुर्दैवा आता हे बदला वगैरे घेवून पिक्चर संपेल असे वाटले पण नाही अफजलखानाने जसा शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला होता तसा या 'राडा रॉक्स' च्या टीमने आमच्या मेंदूचा पार पार भुगा करून टाकायचा विडा घेतला होता. हे सगळे वीर मग एका रियालिटी शो मध्ये जातात .

या रियालिटी शो चे सुत्रसंचलन करणारी भार्गवी चिरमुले म्हणजे आपल्या नामोहरण करण्यासाठी उगाच वेडेवाकडे हावभाव करणारे एक अस्त्र आहे, काय ते बोलणे , चालणे अर्रेरे .....पण काय करता १०२ रु प्रत्येकी दिले होते ना त्यामुळे पाहिले पुढे . येथे येणाऱ्या प्रत्येक ग्रुप चे आचरट चाळे पाहताना जीव नकोसा होत होता त्यात त्यांच्या परफोरमंस वर जजेस ची मते शंकर महादेवन , जुही चावला , अन्नू मलिक , सुखविंदर सिंग अशी मात्तबर मंडळी..... अनु मलिक मात्तबर का? या बाबत शंका आहे . शंकर महादेवन चे मराठी सोडले तर इतर लोकांचे मराठी म्हणजे आपली थट्टा. त्या सुखविंदर सिंग चे मराठी म्हणजे ५ वर्षाच्या मुलाला ३ वर्षाच्या मुलाचे कपडे जसे ओढून ताणून बसवता येतील त्या दर्जाचे ओढूनताणून बोललेले .जावू द्या त्यांना तरी काय दोष द्यायचा म्हणा सई ताम्हणकर बाईंचे इंग्रजी मधील डायलॉग डिलिव्हरी ठीक गटात मोडणारी मात्र मराठी शिव शिव शिव ........वास्तविक सांगली मध्ये जन्मलेली , वाढलेली ही बया लंडन सोडून आपण काही पाहिले नाही अश्या अविर्भावात मराठी बोलत होती.सांगलीतले इतर सगळे सोडून सांगलीच्या आयर्विन पुलाच्या आयर्विनचे गुण घेतले वाटते. पराग पाटील , निशा परब हे लंडन च्या ऐवजी बर्मिंगहम मधून आले असतील त्यामुळे त्या सुखविंदर ला काय दोष देणार तो तर बिचारा पंजाबातील आहे. या रियालिटी शो मध्ये कुडकेश्वर ग्रुप आहे .... घाणीतून नुकताच उठलेला डुक्कर जितका किळसवाना वाटेल तितकेच किळसवाने प्रकार ही मंडळी करत होती. यांचा डान्स म्हणजे रस्त्यावर झोपलेले कुत्रे जसे आपले हात पाय हलवते तसे हात पाय हलवणे म्हणजे डान्स.

एवढा सगळे करून त्या रियालिटी शो मध्ये दुसराच ग्रुप जिंकतो कारण स्पॉनसरचे राजकारण आडवे येते. हा निकाल ऐकल्यावर भार्गवी बाई चालू कार्यक्रमात 'बुलशिट' म्हणून ओरडतात आणि प्रत्येक जज आपापली प्रतिक्रिया देवू लागतो. मलिक साहेब तर काय म्हणाले ते त्यांना तरी कळले का ... ते म्हणतात जनतेने मत देण्यापूर्वी हा विचार करावा कि लय लय होती है, ताल ताल होता है , सूर सूर होता है '......मला तर काही कळले नाही ...तुम्हाला ? एवढा अत्याचार कमी कि काय म्हणून त्या रियालिटी शो मधून वापस आल्यावर भुकेल्या कुत्र्यासारखे या गटाची वाट बघणारे ते कॉलेजातील दोन गट टपून बसलेले असतात त्यांचा उपदेश आपल्याला ऐकावा लागतो. या पिक्चर मध्ये पोलिसांना फक्त याच कॉलेजातली लफडी सोडवण्यासाठी नेमले असावे अशी शंका येते. काय ते कॉलेज , त्यातील प्राध्यापक आणि ही असले वेडी बिद्री मुले. हे लोक वापस येतात तेंव्हा सुनील शेट्टी साहेब पिक्चर मध्ये येवून त्या दोन्ही गटांना समजावतात आणि सर्व गोष्टी गोड होतात.

त्यानंतर सोमवारचा पेपर वाचला कोथरूड मध्ये सोसायटीमध्ये या चित्रपटाशी संबंधित कलावंतानी राडा केल्याप्रकरणी ........बरोबर आहे असले राडे करायची सवयच जडली असावी त्यामुळेच तसला पिक्चर बनवला आणि नंतर हा घोळ ...लोक तरी किती सहन करणार .....यांचा खुलासा काय मी चांगल्या घरातील मुलगी आहे ...अग दाखव न मग तशी लक्षणे .....तो संजय दत्त पण चांग्लायचं घरातला होता आई-वडील प्रख्यात पण केली ना त्याने घाण, राहुल महाजन पण आहेच ....

तर असला हा 'सई रे सई ' राडा .........सई बाई पुढे थोडे अभिनयाचे आणि कसे वागायचे याचे शिक्षण घ्या आणि आपल्या मित्रानाही सांगा ......
.
.
.
.
तर शेवटी काय पुढच्या शुक्रवारी कोणता पिक्चर येणार !!!!! गूगल करतो .....असेलच मी तिकडे कोठे तरी शेवटी काय ही जित्याची खोड मेल्याशिवाय जायची नाय उगाच नाही म्हणालो माझी चित्रपट पहाण्याची दैदिप्यमान कारकीर्द आहे .............

Sunday, 27 February 2011

भाऊ साहेबांची बखर ---लोकशाही जिंदाबाद!!!







एक आटपाट नगर होते तिथे जगातील सर्वात अदभूत अशी ४ खांबांवर उभी असणारी वास्तू होती , अहो कौरवांचा मोरू करायला पांडवानी बांधलेल्या मयसभेसारखी ही आश्चर्याचे धक्के देणारी ही वास्तू असल्याने तिला अदभूत म्हणले गेले. देशोदेशीचे विचारवंत , विद्वान, विदुषी ( विदूषकाचे स्त्रीलिंगी रूप माहित असल्यास कळवणे) या नगरात येवून त्या वास्तूच्या करामतीची अनुभूती घेवून त्या वास्तू विषयी आपापली मत मतांतरे व्यक्त करू लागले. त्यातून मतांचा गलबला निर्माण होवू लागला या गलबल्यामूळे केवळ 'मत' हेच या वास्तूचे एकमेव महत्वपूर्ण अंग असल्याचे पुढील शतकातील लोक म्हणू लागलील अशी शक्यता काही धुरिणांनी व्यक्त केली मात्र अधिक अभ्यासांती विधिमंडळ , न्यायमंडळ , कार्यकारी मंडळ आणि प्रसारमाध्यमातील मंडळी असे त्यावास्तुचे ४ खांब देखील या वास्तूच्या जडणघडणीत महत्वाचे असल्याचे आढळून आले. त्या वास्तूच्या शिर्षभागी असणारे 'लोकशाही' हे नाव देखील दिसून आले.

ही सर्व साठ उत्तराची कहाणी अर्धी नुर्धी जशी जमेल तशी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी इलेक्ट्रोनिक प्रसारमाध्यमांनी आपापली 'बोन्डूके' सांभाळीत बाईट देण्यास सुरवात केली. ते वर उल्लेखित ' धुरीण' म्हणजे हीच मंडळी असल्याचेही निदर्शनास आले आहे. प्रिंट माध्यमातील बोरुबहाद्दर देखील ही कहाणी चितारण्यासाठी आपला मीठ मसाला घेवून पुढे सरसावली.

कार्यकारी मंडळ हा खांब वास्तूच्या अग्रभागी असल्याने लोकशाहीचा चेहरा म्हणजे आपणच हे दर्शविण्यासाठी अतिउत्साहाने पुढे पुढे करू लागला. कार्यकारी मंडळ ही अधिकार रूढ लोकांची बाजू असल्याने विरोधकांचा या दिखावूपणामुळे तिळपापड झाला.त्यांनी विधिमंडळ या खांबाद्वारे नरसिन्हासारख्या डरकाळ्या फोडायला सुरवात केली. संसदीय आयुधे वापरणारा हा खांब मग पेपरवेट, कागदी बाण यांसारख्या आयुधांचा वापर करून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या डरकाळ्यामूळे वास्तू हद्रायला लागली . हा तमाशा दूरपर्यंत चलचित्राद्वारे पोहचविण्यासाठी मिडीयावाला खांब देखील उत्सुक झाला आणि दोन खांबांच्या भांडणात कळलाव्या नारदाची भूमिका बजावू लागला , अर्थात सर्वच मिडीयावाले नारदाच्या भूमिकेत नव्हते मात्र त्यांचा गोबेल्स तंत्राचा अभ्यास कमी पडला असावा त्यामुळे त्यांची अडगळीची खोली झाली होती. तार स्वरात भांडण करणारे ते दोन खांब आणि कळीच्या नारदाकडेच सर्वांचे लक्ष होते त्यामुळे यात ते अडगळीतील काही जन आणि ज्याच्या समोर हा तमाशा चालू होता तो 'आम आदमी' यांचा क्षीण आवाज कोणालाही ऐकू येत नव्हता.

त्या वास्तूच्या समोरच आर के लक्क्षुमनांनी रंगवलेले अनेक ' कॉमन मेन ' विषन्न , पिचलेल्या , मारून मुटकून बसवल्यासारख्या अवस्थेत हा सर्व तमाशा पाहत होते. प्रचंड दबाव असला तरी कार्यकारी मंडळाचा खांब शांत का बसत नाही या विचाराचा भुंगा तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या कानात गुणगुणून गेला पण त्यांना काय माहिती या सर्व राजावाल्या, रामवाल्या आणि राडीयावाल्या मंडळीचे आतून साटेलोटे आहे आणि त्यामुळे 'तेरी भी चूप मेरी भी चूप असाच सर्व मामला होता.

मग आणीबाणीची परिस्थिती (इंदिरा गांधी वाली नाही) आली की शंकर जसा तिसरा डोळा उघडतो तसे डोळा उघडून न्यायमंडळ या खांबाने कार्यकारी मंडळाची पाळता भुई थोडी करायला सुरवात केली . काळा पैसा काय, CWG काय, २ G काय सगळ्यामुळे कार्यकारी मंडळाची दाणादाण उडाली अहो देशमुखांच्या गढीला देखील हादरे बसू लागले. पामोलीन तेलावरून कार्यकारी मंडळाचा पाय घसरला आणि ते तोंडघशी पडायची वेळ आली, थोमास साहेब देखील दाद लागू देईनात संकटात सापडल्यावर कोण कसा वागेल याची प्रचीती त्या मंडळाला येवू लागली . अहो शेवटी एकेकाचा काळ असतो. या सर्वांमुळे वास्तूचा समतोल ढळायला लागला त्याचे सौंदर्य , अदभूतता यांच्या समोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले. हा असमतोल दूर करून निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी न्यायमंडळ 'न्यायिक पुनर्विलोकन', 'जनहित याचिका ' या शस्त्रांचा वापर करू लागले पण अति तिथे माती या न्यायाने निर्माण झालेला असमतोल दूर होणे दूरच पण ती लोकशाही नामक वास्तूच खिळखिळी होवू लागली. आता ही वास्तू आपल्या अंगावर कोसळेल आणि त्याखाली सापडून आपला अंत होईल असा ' आम आदमीला ' भास होवू लागला. फार पूर्वी लिंकन नामे प्रभृतीने या वास्तूविषयी लिहिताना ही वास्तू म्हणजे ,लोकांची ,लोकांसाठी , लोकांनी बांधलेली वास्तू असे वर्णन केले होते. आम आदमीला त्यामुळे असेही वाटू लागले ही वास्तू 'लोकांसाठी ' म्हणजे दुसऱ्या कोणासाठी तरी असून आपला त्यांचा काही संबंध नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर आटपाट नगरजवळील इजिप्त , ट्युनिशिया या भागात असलेली 'हुकुमशाही ' नावाची एका खांबावर उभी असलेली वास्तू नगरवासियांनी पहिली होती. काहीजण त्यावास्तुच्या बाह्य आकर्षणावर फिदा पण झाले होते पण आणीबाणी कालखंडात ( आता इंदिरा गांधी वाली) त्यांनी त्याची चुणूकही अनुभवलेली होती. 'दुरून डोंगरे साजरे' या म्हणीची प्रचीती तेंव्हा आलेला असल्याने आपल्या नगरातील 'लोकशाही' नामक वस्तूच्या अस्थिर अवस्थेवर काय अक्सीर इलाज सापडेल या विषयी आम आदमी इतर खांबा समवेत चर्चा विनिमय करू लागला. त्यांच्यापर्यंत इजिप्त मधील लोकशाहीवादी क्रांतीची बातमी देखील पोहोचल्यामुळे सर्वच जणांना त्यातून योग्य तो संदेश मिळाला होता.

अशावेळी थंड वाऱ्याची झुळूक यावी त्याप्रमाणे त्यांना आशेचा मार्ग लोकशाहीचा पाया असणाऱ्या 'संविधानरुपी' ग्रंथाद्वारे दृष्टीक्षेपात आला. आम आदमीने विचार केला जरी या ४ खांबामध्ये तमाशा रंगत असला तरी नुकताच अंमळ उशिरा का होईना पण कार्यकारी मंडळाचा नेता आपल्याशी थेट बोलला आहे , विधिमंडळ देखील आरडा ओरडा थांबवून संवाद साधण्यावर भर देत आहे , मिडिया कडून देखीलकाही आगळीक होत असली तरी त्या ग्रीस मधील 'मिडिया' या देवते प्रमाणे अद्दल घडवण्यासाठी हा मिडिया आपल्याच मुलांचा जीव घेण्याइतका निष्ठुर झालेला नाही त्यामुळे या सर्वांना योग्य तऱ्हेने वेसण घातले तर 'लोकशाही' या वास्तूची अदभूतता कायम राहील. या उपायानुसार आम आदमीने त्यावास्तुच्या 'Walls ' बांधायला घेतल्या , मग काही जणांनी त्या 'Walls ' चा उपयोग वास्तूच्या कामकाजाबद्दल, त्याच्या खांबा विषयी स्टेटस लिहायला चालू केले, त्यावर कमेंट्स टाकता येतील , लाईक , अनलाईक अशा गोष्टी करता येतील ही सोय केली. काही जन यातील ' scrap ' मालातून देखील जनजागृती करता येईल अशी व्यवस्था करून सारखे ट्विट ट्विट करू लागले. विल्यम डटन नावाच्या समाजशास्त्राद्याने तर या नवीन शोधला त्या वास्तूचा 'पाचवा खांब' म्हणावयास सुरवात केली. सोशल नेटवर्किंग असे त्या खांबाचे नाव पडले.

या आटपाट नगराचा पुर्वेइतिहास जगाला मार्ग दाखवण्याचा होता , त्यामुळे हताश न होता आव्हानांना पुरून उरून 'लोकशाही' या वास्तूला जतन करणे आवश्यक असल्याचे नगरवासीय आणि त्या वास्तूच्या घटकांना देखील उमगले होते कारण कोणताही विसंवाद , कटुता दूर करण्याचा मार्ग त्या वास्तूतून जाणारा असल्याने त्यांनी 'हुकुमशाही ' या वास्तूचे हिंसा हे फिचर न स्वीकारता संविधानाच्या अधीन राहून व्यक्ती स्वातंत्र्य वर आधारित ' सुसंवाद' याचाच स्वीकार केला आणि लोकशाही ही वास्तू म्हणजे केवळ मतांचा गलबला नसून आम आदमी हाच त्या वास्तूच्या अस्तित्वाचा प्राथमिक आणि एकमेव स्त्रोत असल्याचे सर्वांना दाखवून दिले.

Sunday, 26 December 2010

नागपूर पुराणम मार्गे विधिमंडळ !!!



'स्पार्क' जॉईन केल्यानंतर पहिलाच मोठा गड चढायचा होता (सर करणे दूरच )तो म्हणजे नागपुरातील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन. अधिवेशन १ डिसेंबरला चालू होणार होते मात्र हिवाळी अधिवेशनाचा पूर्वानुभव लक्षात घेता अधिवेशनाचा पहिला आठवडा 'गोंधळी' या लोककलेला समर्पित केला पाहिजे या भावनेत सर्व सदस्य असतात त्यामुळे आम्ही ऑफिसातील पाच जण दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीपासून नागपुरात शड्डू ठोकण्यासाठी मुंबईहून ५ डिसेंबरला रेल्वेने निघालो ( अहवालांच्या भल्यामोठ्या ब्यगसहित वरळीतील ऑफिस ते सी एस टी चा गाठलेला प्ल्यटफॉर्म १७ या प्रवासाविषयी नंतर कधीतरी).

राज्याशी संबंधित विविध विषय , धोरणे यांचा अभ्यास करून त्यातील स्वागतार्ह तरतुदी,त्रुटी, पर्यायी मार्ग अहवालरूपाने धोरणकर्त्यांना ( आमदार , मंत्री ) सादर करणे हे आमच्या कामाचे थोडक्यात स्वरूप आणि त्यासाठीच अहवालांचा बाडबिस्तरा घेवून भारताच्या मध्यबिंदुकडे प्रयाण केले होते. महाराष्ट्रात सामील होताना तत्कालीन मध्य प्रांतातील वऱ्हाड भागाच्या संबंधाने झालेल्या 'नागपूर करारा'न्वये महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन या संत्रानगरीमध्ये भरते. दारिद्र्य ,पाटबंधारे,शिक्षण इत्यादी विषयांवरील अहवाल आम्ही बाळगून होतो, मी या इत्यादींमधील महाराष्ट्र शासनाच्या 'सेझ' आणि शहराचे वास्तुशास्त्रीय स्वरूप ठरवण्यासंबंधीच्या ' इमारतीचे दर्शनी भागाची दुरुस्ती' या दोन विधेयकांवर अहवाल तयार केले होते. येथे निघण्यापूर्वी नागपूरच्या थंडीचा मुंबईकरांना बाऊ असल्याने किमान तापमान पहिले होते ते तर तब्बल २५ सेल्सियस त्यामुळे मी स्वेटर वगैरेंचा नादच सोडला होता ( स्वेटर ब्यग मध्ये जास्त जागा घेते , हा देखील त्यामागचा विचार ) . नागपुरात उतरल्यावर जाणवले मी येण्याचा मुहूर्त पाहूनच निसर्गाने आपला पारा वरखाली करायचा ठरवले होते , तापमान तब्बल ७ सेल्सियस ने खाली उतरलेले , देवेंद्र फडणवीस तर म्हणाले सुद्धा " नागपूरची गेलेली थंडी घेवून आला तुम्ही लोक ".

आता नागपुरात पोहचल्यावर पहिले काम होते लॉज गाठून निवांत डुलकी मारून फ्रेश होण्याचे , ते सोपस्कार झाल्यानंतर मला जेवणाएवढा आवश्यक असणारा पेपर आहे का ?म्हणून रिसेप्शनला विचारले तर आजचा नाही कालचा आहे देवू का ? असे तेथल्या माणसाने विचारले अहो कालचा ! असे उद्गारलो तर साहेब मला गप्प करत म्हणतात कसे , आज काय तुमचा फोटो येणार होता का ? अहो माझा फोटो पेपरला येत असला असता तर तुमच्या लॉजमध्ये कशाला थांबलो असतो सरळ चांगले 'प्राईड इंटरन्यशनल' गाठले असते , तरी बरे दुसऱ्या दिवशीच्या ' हिंदुस्थान टाइम्स'ला आमच्या अहवालांच्या आधारे एक बातमी होती , फोटो नव्हता हा भाग अलाहिदा , म्हंटले चला नागपुरी झटका तर मिळाला , नागपुरात आल्याचे तेवढे तरी समाधान.

या सर्वानंतर 'आमदार निवासा'तून अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्यांचे पुस्तक आणणे आणि त्यावर टिपण तयार करणे असा कार्यक्रम होता, अधिवेशनाच्या निमित्ताने केलेली रंगरंगोटी तसेच दादा , तात्या, भाऊ, राव , साहेब यांचे केलेले स्वागत त्यावेळी निदर्शनास आले अर्थात फलकांच्या आधाराने, आणखीन एक उल्लेखनीय फलक होता तृणमूल कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आलेल्या स्वागताचा, ममता दिदींनी काय ज्या राज्यात टाटा तिकडे आपला मोर्चा असे धोरण आखले की काय असे वाटले.

अधिवेशन काळात राज्यभरातून पोलीस येथे बंदोबस्तासाठी येतात , खुल्या लोकशाहीतील कडेकोट कारभार त्यामुळे पासेस शिवाय 'आम आदमीच्या' नशिबी 'आम'दारांची भेटदेखील दुर्लभ होवून गेली आहे. ६ डिसेंबरला आंबेडकरांच्या महापरीनिर्वाणामुळे शासकीय कामकाजाला सुट्टी असल्याने आम्हीदेखील निवांत होतो , फक्त त्या दिवशी रात्री विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याकडे आमच्या अहवालांचा विधिमंडळात कसा उपयोग करायचा यावर एक मिटिंग झाली.

विधीमंडळासाठीचे पासेस आमच्याजवळ असल्याने आम्ही प्रवेशासाठी पास झालो आणि आतापर्यंत असणारी उत्सुकता अधिकच शिगेला पोहचली कारण आतापर्यंत दुरूनच दर्शन झालेले विधिमंडळ 'याची देही याची डोळा' पहावयास मिळणार होते, प्रत्यक्ष विधानसभेत किंवा परिषदेत बसून चर्चा ऐकण्याचे पास आमच्याकडे नसले तरी आतापर्यंत अनेक आमदारांनी पळवलेला ' राजदंड ' पाहता येईल तसेच सर्व मंत्री , पक्षांची कार्यालये, सभापती, अध्यक्ष यांच्या दालनाचा फेरफटका मारता येईल एवढी मुभा आम्हाला होती आणि याचा पुरेपूर लाभ उठवत आम्ही ' राज्यकारभाराच्या वर्तुळात ' चंचुप्रवेश’ करत होतो. सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना भेटून आम्ही आमच्या अहवालांचा सेट त्यांना सुपूर्त करत होतो तसेच काही अभ्यासू आमदारांना देखील आम्ही आमचे अहवाल दिले , काहींनी अहवालाकडे पाहून न पाहिल्यासारखे केले , काहींनी कौतुक केले तर काहींनी खरेच ते अहवाल पाहून त्याविषयीच्या भल्या बुऱ्या प्रतिक्रिया देखील आम्हाला दिल्या तसेच अहवालात आणखी काय सुधारणा हव्या ते देखील सांगितले. याच आवारात लोकशाहीच्या चौथ्या खांबावर लगडणारी आणि नागरिकांना सतत बातम्या पुरवणारी दृक-श्राव्य आणि प्रिंट माध्यमातील अनेक मंडळी भेटली . विधिमंडळात त्या दिवशी 'टोलनाका' या विषयावर चर्चा असल्याने त्या विषयाशी संबंधित कंपन्यांचे PRO देखील आपली बाजू सरकारात बळकट करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक असा भेद विसरून ' टोलनाक्यांचा खुंटा हलवून आणखीन भक्कम करताना दिसली , हे पूर्वी ऐकलेले नागपुरात प्रत्यक्ष पाहता आले.

नागपुरात रामदास कदम यांनी आम्हाला केवळ भेटीचा वेळच दिला नाहीतर दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचे आमंत्रण देखील दिले , त्याशिवाय एकूणच त्यांची बोलणे चालणे राजकारणी लोकांमधील माणूस म्हणून असणाऱ्या बाजूची झलक दाखवणारी होती .

एक आठवड्याच्या नागपूर मुक्कामात सत्तेच्या वर्तुळात फेरफटका मारत असताना काही समृद्ध करणारे अनुभवदेखील आले, विधिमंडळात मांडले जाणारे प्रशन , त्याची पद्धत , या सर्वांमागील कार्यकारणभाव आणि एकूणच विधीमंडळाचे प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याचा माझ्या पुढील वाटचालीमध्ये निश्चितच उपयोग होईल, आमच्या अहवालातील माहितीचा प्रत्यक्ष विधिमंडळात योग्य वापर करता यावा यांसाठी विविध संसदीय आयुधांचा गहन अभ्यास गरजेचा आहे हे देखील जाणवले , विशेषत: विधानसभा अध्यक्षांच्या दालनात यांचे महत्व अधिक पटले.

नागपुरातील मुक्कामात विधीमंडळाखेरीज इतरही अनेक गोष्टी नजरेखालून गेल्या , येथे ३ सीटर रिक्शा याचा अर्थ १ ड्रायव्हर आणि ३+२ असावा , प्रत्येक रिक्शामध्ये मागच्या सीटसमोर एक फळी होती त्यावर दोघांनी कसरत करत बसायचे , अगदी पोलिसांच्या नाकाखाली या गोष्टी चालतात थोडक्यात शासकीय इतमामात हे रिक्शावाले ३+२ लोक घेवून फिरतात . एकदा तर खुद्द एका पोलिसाने आम्ही पाच जण पाहून एकच रिक्शा करा उगाच दोन रिक्शा साठी कशाला पैसे घालवता असा 'माणुसकी' ला स्मरून सल्ला दिला, तसेच येथे फिरताना 'चौक ' याचे इंग्रजी रुपांतर करून मुंजे स्क़ेअर , व्हरायटी स्क़्वेअर असेदेखील बस थांबे दिसून आले. नागपुरातील 'सावजी' हा मसाल्यांचा प्रकार येथील संत्र्यांसारखाच प्रसिद्ध आहे, आमची कामे उरकल्यानंतर एके दिवशी 'शुक्रवारी तलाव ' येथील जगदीश उपाहरगृहात आम्ही अभक्ष्य भक्षणावर ताव मारला , या मसाल्याने आमच्या नाका-तोंडातून पाणी काढले हा भाग निराळा मात्र जेवल्यानंतर आमची स्थिती 'मोगाम्बो खुश हुवा' अशी असल्याने त्या पाण्याकडे आम्ही दुर्लक्ष केले .

एकूणच भारताच्या मध्यबिंदूतील हा अनुभव मला माझ्या कामात उच्चबिंदूपर्यंत नेईल अशी आशा करतो आणि ........
सांप्रतयुगे भारतखंडे महाराष्ट्रप्रान्ते मुंबानगरी लिखित नागपूर पुराणाम संपूर्णम अशी इतिश्री करतो .....................

Tuesday, 14 December 2010

ये है मुंबई मेरी जान !!!

मला सांगा मुंबापुरीचे आकर्षण भारतात कोणाला नाही, सर्वसामान्यत: सर्वच 'मध्यमवर्गीय' मुंबईच्या भेटीसाठी आतुर असतात , अर्थात खुद्द मुंबईकर सोडून ,त्यांना कशाला असेल हो आकर्षण कारण जिथे पिकत तिथे विकत नाही म्हणतात हेच खर. पु.लं.नी एका ठिकाणी म्हणल्याप्रमाणे 'मुंबईकराचे नशीब हे घड्याळाला बांधले असते मग अशावेळी सवड मिळणार तरी कशी आणि कधी?' पण म्हणजे त्यांची ईच्छा वा आकांक्षा धुमसत नसते असे नाही,आठवडाखेर लोकल स्टेशन्स ऐवजी मॉल, हॉटेल्स तुडुंब भरून वाहतात हे त्याचेच द्योतक नव्हे का.

नमनाला एवढे घडाभर तेल लावल्यानंतर मुळ विषयाकडे येतो, 'यूपीएससी'च्या वाऱ्या संपल्यानंतर उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविणे गरजेचे होते. एक वर्ष ( नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० ) विझिटिंग लेक्चररशीप केली , मात्र पोष्टाच तिकीट घट्ट चिकटाव तसा अजून कोठेही चिकटलो नव्हतो. अशा संधीने २०१० हे वर्ष संपता संपता माझे दार ठोठावले आणि मी Socio Political Analysis and Research kendra अर्थात (SPARK - स्पार्क) मध्ये नोव्हेंबरच्या मध्यात 'प्रोग्राम असिस्टंट' म्हणून मुंबापुरीत रुजू झालो. मुंबई तशी मला नवी नाही , १९९९ ला पहिल्यांदा मी या मायानगरीचे दर्शन घेतले होते आणि त्यानंतरदेखील अधून मधून भेटीचा योग येतच होता . विझिटिंग लेक्चररशीपच्या काळात माझ्या 'शनिवार' आणि 'रविवार' चा साक्षीदार हे मुंबई शहर होतेच तरीदेखील मुंबई मध्ये नौकरी आणि राहण्यासाठी येतांना उत्सुकता , आनंद आणि अनामिक भीती यांचे मिश्रण माझ्या मनात होते.

मुंबईला आल्यानंतर इथली अहोरात्र वाहणारी गर्दी पाहून , मुंबईमधील इतर स्थिती-गती पाहून आणि एकंदरीतच वातावरण पाहून या नगरला श्रमशूर नागरी म्हणावे का जादुईनगरी म्हणावे का धावते समालोचन सारखे धावते शहर म्हणावे हा प्रश्न मला पडला. झाड जसे आलेल्या प्रत्येक वाटसरूला निरपेक्षपणे सावली देते तसेच मुंबईला आलेल्या प्रत्येकाला या शहराने काम दिले आहे , हातातोंडाच्या जुळणीची दररोजची भ्रांत येथे मिटत असेलच अशी मला खात्री वाटते आणि त्यामुळेच तर येथे स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या मुबलक आढळते. येथे रु.५ च्या वडापाव पासून रु. ५००० च्या इटालियन पास्त्यापर्यंत खाण्यासाठी सगळे काही मिळते ते देखील २४ तास , VT च्या मागच्या गल्लीत तर जेवण बनवून देणारे खानसामे येतात तेच मुळी रात्री बारा वाजेनंतर.

जेवणाचा प्रश्न सोडविन्यासोबातच आपल्या समाजातील मुख्यत: ग्रामीण भागातील काही अनिष्ट चाली-रितीना ( जात-पात ) कंटाळून आत्मसन्मान टिकवण्यासाठीदेखील (विशेषत: उत्तरेकडील ) दलितवर्ग मुंबईत येत असेल कारण या नगरात श्रमाला जास्त किंमत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळेच खेड्यांना अहंकाराची डबकी आणि शहरांना मुक्तीचे द्वार म्हटले होते. स्थलांतरित लोकांच्या संखेत वाढ होण्याचे केवळ तेच एक कारण मात्र नाही, संधींची मुबलक उपलब्धता आणि आपल्यातील क्षमतांना मुंबईच योग्य न्याय देईल असे वाटत असेल त्यामुळेच अनेक लोक येथे दररोज धडकत असतात किंबहुना मुंबईची जडणघडणच त्या दृष्टीने झाली आहे . मुंबईवर पूर्वी मराठे किंवा मुघल यापैकी कोणाचेही राज्य नव्हते , मुंबई निर्माण केली तीच मुळी इंग्रजांनी त्यामुळे पाश्चात्य जगतातील कामसूपणाचा गुणच या नगरीने उचलला असेल बहुतेक !

मुंबईत 'पोटोबा' संतुष्ट होत असला तरी या सतत जागे असणाऱ्या शहरात 'घरोबा' कुठे करावा या प्रश्नाचे उत्तर दस्तरखुद्द 'मुंबादेवी' तरी देवू शकेल काय ? अशी परिस्थिती आहे. जमिनीच्या किमती ऐकून डोळे पांढरे होण्याची वेळ येथे आहे सिमेंटच्या या जंगलात 'वणवण' फिरावे लागले तरी 'वन रूम किचेन ' घर बजेट मध्ये मिळेल याची शाश्वती देता येणार नाही अर्थात या जमिनीच्या सहाय्याने काळ्याचे पांढरे पैसे करणारी बरीच मंडळी या शहरात वावरतात हे देखील तितकेच खरे.

मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल आता माझ्यासाठी देखील श्वासाइतकी अविभाज्य बनलेली आहे कारण मी राहतो ठाण्यात आणि काम करतो वरळीत ( एकूण प्रवास वेळ १.४५ मिनिटे ). आजपर्यंत लोकलमधील लोकांचे ग्रुप्स त्यांच्या गप्पा , गोष्टी, ऋणानुबंध याविषयी केवळ ऐकले होते किंवा पहिले होते आता मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो आहे. गेल्या एक महिन्यातच लोकलमध्ये माझी जागा धरून ठेवेल असा एक ग्रुप देखील जमला आहे, या सर्वांमुळे मी ठाणे ते वरळी प्रवास एन्जोय करतो आहे , घड्याळ आणि काम यांच्याबाबत जमवून घेतले तरच मुंबईकर होण्यातली मजा अनुभवता येते असे वाटते. सध्यातरी मी मुंबईमध्ये रुळत चाललो आहे ,थोडक्यात मुंबईकर होत जाण्यातली मजा मी ( एक स्थलांतरित) अनुभवत आहे . बघूया पुढे काय होते ते !!!



....आखिर ये है मुंबई मेरी जान !!!